पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुभव मासिक - सप्टेंबर २०२०

इमेज
  मुखपृष्ठ छायाचित्र : प्रणव संत Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger ×

अनुक्रमणिका - सप्टेंबर २०२०

  लेख आत्मनिर्भर म्हंजे रे काय भाऊ ?  : मंगेश सोमण   लोकशाहीला नवा धोका सोशल मीडियाचा ?  : राम जगताप आजही नष्ट होऊ शकते मानवजात ?  : निरंजन घाटे   माणसं अमूर्ताच्या शोधात चित्रकार- सुभाष अवचट : अन्वर हुसेन   शोधत सुटलेला माणूस- निळू दामले : सुहास कुलकर्णी निमित्त कोव्हिड ये दुख काहे खतम नहीं होता बे ?  : सायली तामणे   कोरोनाव्हायरस , आपण आणि मानसतीर्थयात्रा : आशीष महाबळ  शिक्षणदिन विशेष भटक्यांमधले टॉपर्स : प्रशांत खुंटे  लॉकडाऊनमधले शिक्षणप्रयोग : संतोष मुसळे थोडक्यात महत्त्वाचं जगभरातल्या नोंदी : निळू दामले  Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger ×

आत्मनिर्भर म्हंजे रे काय भाऊ? - मंगेश सोमण

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सध्या ‘ आत्मनिर्भर भारत ’ हा शब्द परवलीचा बनवला आहे . पण आत्मनिर्भर बनणं आपल्या देशाला खरोखर शक्य आहे का आणि या नव्या धोरणाचे फायदे - तोटे काय याची चर्चा करणारा लेख .   कोरोनाच्या टाळेबंदीने ग्रासलेल्या देशबांधवांना उद्देशून पंतप्रधानांनी १२ मे रोजी केलेल्या भाषणात आत्मनिर्भर भारत ही नवीन घोषणा केली . ते असं म्हणाले की करोनाच्या आपत्तीचं संधीत रूपांतर करण्यासाठी सरकार जो आर्थिक कार्यक्रम राबवणार आहे , त्यातून भारताला आत्मनिर्भर बनवण्यावर भर दिला जाईल . त्याच भाषणात त्यांनी अर्थव्यवस्थेला लॉकडाऊनच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचा सरकारी मदतीचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याचे तपशील नंतर अर्थमंत्र्यांनी ‘ आत्मनिर्भर भारत अभियान ’ या शीर्षकाखाली जाहीर केले . मोदींचं सरकार हे आकर्षक आणि चमकदार घोषणा बनवण्यात तसं वाकबगार आहे . मेक इन इंडिया , स्किल इंडिया , शेतकऱ्यां चं उत्पन्न दुप्पट , पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था अशी अनेक घोषणावाक्यं गेल्या काही वर्षांमध्ये जन्माला आली . अशा घोषणा लोकांपर्यंत आर्थिक

लोकशाहीला नवा धोका सोशल मीडियाचा? - राम जगताप

इमेज
  सोशल मीडिया म्हणजे सर्वसामान्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं माध्यम. पण अलीकडे राजकीय आणि आर्थिक सत्ताधारी या माध्यमाचा वापर आपल्या स्वार्थासाठी करू लागल्याचं मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये फेसबुकवर सत्ताधार्‍यांची तळी उचलून धरल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या माध्यमांवर होणार्‍या टीकेचा उहापोह.   आजवर सोशल मीडियाकडे एकविसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाची क्रांती म्हणून पाहिलं जात होतं. केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेच नव्हे , तर सर्वसामान्यांच्या हातात अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देणारं माध्यम असल्याने त्याचं लोण झपाट्याने देशोदेशांमध्ये , अगदी खेड्यापाड्यांमध्येही पसरलं. खेड्यांतल्या साध्यासुध्या तरुणांसमोर सारं विश्‍व खुलं झालं आणि त्यांचं म्हणणं त्यांना थेट जगाच्या व्यासपीठावर मांडता येऊ लागलं. जगभरच्या पत्रकारांनी , अभ्यासकांनी , विचारवंतांनी त्यासाठी सोशल मीडियाची आणि विशेषतः फेसबुकची भलामणही केलेली आहे. आखाती देशात तर प्रत्यक्ष क्रांती घडवून आणून सत्ता बदल करण्यात फेसबुकचा महत्त्वाचा वाटा होता. भारतातही अनेक मोहिमा , कॅम्पेन सर्वदूर पोहचवण्याचं

सुभाष अवचट : अमूर्ताच्या शोधात चित्रकार - अन्वर हुसेन

इमेज
    चित्र :अन्वर हुसेन  सुभाष अवचट हे भारतीय कलाविश्‍वातलं महत्त्वाचं नाव. या प्रयोगशील चित्रकाराने नुकतीच वयाची सत्तरी गाठली. त्यानिमित्ताने , त्यांचे तरुण चित्रकार मित्र अन्वर हुसेन यांनी लिहिलेला लेख. अवचट यांचं हे पोर्ट्रेटही अन्वर यांनीच चितारलेलं. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि माझा मित्र ‘४ , शाकुंतल’च्या दरवाज्यासमोर उभे होतो. बंद होता दरवाजा. एकदा बेल वाजवली. दार उघडलं गेलं नाही. आत कुणी आहे-नाही काही कळत नव्हतं. थांबलो तसेच थोडा वेळ. मनात खूप उत्सुकता वाटत होती त्या क्षणी. या बंद दरवाज्याच्या आत काय काय असेल ? कुठे कुठे पाहिलेली , वर्तमानपत्रात , मॅगझिन्समध्ये छापून आलेली ती चित्रं , इथेच आत असतील ना ? खूप मोठी चित्रं असतात त्यांची , असं ऐकलेलं. ते मला प्रचंड आवडलेलं त्यांनी केलेलं पोर्ट्रेट- ते असेल का इथे ?... असंख्य विचार तरळून जात होते , पण दरवाजा बंदच. दुसर्‍यांदा बेल दाबावी का ? नको... मित्राने आणि मी विचार केला. वळलो आणि जिना उतरून खाली आलो. शेजारीच असलेल्या होस्टेलवर राहिलो होतो आम्ही. डिप्लोमाचं वर्ष होतं. परीक्षेसाठी मुंबईला आलो होतो. आता काही दिवस इथेच राहावं