दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचा आज पहिला स्मृतिदिन. समकालीन प्रकाशन आणि युनिक फिचर्सचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख, सुहास कुलकर्णी यांच्या अवलिये आप्त या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. काही माणसं खूप आधीपासून आपल्या आयुष्याचा भाग असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात बर्याच नंतर भेटतात. अनिल अवचट यांच्या बाबतीत माझं असंच झालं. शाळा-कॉलेजमध्ये असताना जी पहिली लक्षात राहतील अशी पुस्तकं वाचली, त्यात अवचटांची पुस्तकं होती. या अर्थाने अवचट आयुष्यात आले ते वयाच्या सोळाव्या-अठराव्या वर्षी. लेखक म्हणून. पण त्यांची प्रत्यक्ष भेट आणि संवाद सुरू होण्यासाठी त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षं जावी लागली. पण जेव्हा त्यांची भेट झाली, त्यानंतर हा आवडता लेखक मित्रच बनून गेला. पूर्णिया, वेध, छेद, संभ्रम, कोंडमारा, धागे आडवे उभे, धार्मिक, माणसं, वाघ्या-मुरळी, प्रश्न आणि प्रश्न अशी पुस्तकं वाचतच आमची पिढी मोठी झाली. आपल्या मध्यमवर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे, याची जाणीव या पुस्तकांनी करून दिली होती. आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून...
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी
अनुभव दिवाळी २०२० च्या अंकातून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यशैली आणि संघाच्या स्वयंसेवकांचं विचारविश्व हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. संघाच्या स्थानिक वर्तुळात चार दशकं डोळसपणे वावरलेल्या एका सजग व्यक्तीला मागे वळून पाहताना या दोहोंबद्दल काय वाटतं ? बा हेर धो धो पाऊस पडत आहे. दाटून आलेली संध्याकाळ आणखीच दाटून आली आहे असं वाटून राहिलं आहे. मला उशीर झाला आहे... अर्धामुर्धा भिजलेला मी पेंडशांच्या वाड्यात वरच्या हॉलमध्ये जाणारे लाकडी जिने धडधड चढतो. हॉलमधून येणारा पद्याचा आवाज क्रमश: मोठा होत जातो, त्याच क्रमाने मला उशीर झाल्यामुळे आलेलं ओशाळेपण हलकंसं वाढत जातं... दारात चपलांच्या रांगा लागलेल्या आहेत. भिजलेल्या छत्र्यांसाठी बादली ठेवलेली आहे. राज भागवत चपलांच्या रांगांपाशी उभा आहे. मी चपला ओळीत काढतो की नाही यावर त्याचं लक्ष आहे. त्याच्याकडे मी पाहत नाही, पण त्याच्या नजरेचं मला भान आहे... मी चपला बरोबर काढतो. आत शिरताना त्याची-माझी नजरानजर होते. त्याचा चेहरा तसाच गंभीर राहतो... तो हेच काम आणखी किती वर्षं करणार, असं मला क्षणभर वाटून जातं... मी हॉलमध्ये शिरतो. पद्याचं दुसरं कडव...
‘मी ते आपण' : एक एव्हरेस्ट चढताना...
एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर. गिर्यारोहकांच्या महत्त्वाकांक्षेचं प्रतीक. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गिरिप्रेमीच्या चमूने २०१२ साली एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. भारतातली ती सर्वात मोठी आणि यशस्वी नागरी मोहीम ठरली. पण त्या मोहिमेत खुद्द झिरपे मात्र एव्हरेस्टवर चढू शकले नाहीत. तसं असलं तरीही त्यांचं समाधान आणि आनंद प्रत्यक्ष चढाईपेक्षा कमी नव्हता. एव्हरेस्ट दिनानिमित्त वाचायलाच हवा असा एक आगळा अनुभव. ते १९९१ साल होतं. गिर्यारोहणाची चटक लागून मला दहा वर्षं होऊन गेली होती. गिर्यारोहणातले बेसिक आणि अँडव्हान्स कोर्स करून झाले होते. सह्याद्री पालथा घालून झाल्यावर आता हिमालयातल्या शिखरांची ओढ लागली होती. आणि त्याच ओढीने गंगोत्रीमधल्या एका अतिशय कठीण शिखराच्या अपयशी मोहिमेहून मी परतत होतो. या शिखराने आम्हाला एकदा नव्हे, दोनदा पराभूत केलं होतं. त्या शिखराच्या भव्यतेकडे पाहत मी परतलो तो दिवस मला अजूनही आठवतो... गंगोत्रीमधलं सहा हजार मीटर उंचीवरचं हे मंदा शिखर आमच्या कल्पनेपेक्षा खूपच भव्य आणि अवघड निघालं होतं. मी, अविनाश फौजदार, जगदीश चाफेकर, संजय डोईफोडे, जितेंद्...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा