पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निर्भय वायर : नितीन ब्रह्मे

इमेज
अनुभव दिवाळी २०२१ कॉर्पोरेट आणि सत्ताधारी या दोघांच्याही नियंत्रणापासून मुक्त , फक्त वाचकांप्रती जबाबदारी मानणारं समांतर आणि   परिणामकारक माध्यम आजही उभं राहू शकतं , हे ‘ द वायर ’ या न्यूज पोर्टलने सिद्ध करून दाखवलं आहे . पत्रकारितेतली नवी वाट चालणार् ‍ या या प्रयोगाची गोष्ट . २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट . टाइम्स ऑफ इंडिया सोडल्यावर वेगळं काहीतरी करावं , असं वाटत होतं . बरेच दिवस डोक्यात घोळणारा विषय अभ्यासावा म्हणून मी काश्मीरला गेलो होतो . तिथले पत्रकार कसं काम करतात , हे मला बघायचं होतं . तिथून परतताना दिल्लीत मुक्काम होता . दिल्लीतल्या काही चांगल्या पत्रकारांना भेटावं , पुढे काय करता येऊ शकतं याची दिशा मिळवण्याचा प्रयत्न करावा , असं मनात होतं . म्हणून काही पत्रकारांना मेसेज टाकले . ‘ द वायर ’ या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन यांनी लगेचच भेटायची वेळ दिली .  ‘ वायर ’ सुरू होऊन दोनच वर्षं झाली होती , पण देशभरातले माझ्यासारखे अनेक पत्रकार पत्रकारितेची मूल्यं जपणारा वेगळा प्रयोग म्हणून या वेब पोर्टलकडे लक्ष ठेवून होते . त्यावेळचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्य

शेतकरी आंदोलन आखों देखी : विवेक कोरडे

इमेज
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या शेती कायद्यांच्या विरोधात पंजाब , हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकर् ‍ यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू केलं त्याला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नऊ महिने होताहेत . इतका दीर्घकाळ चाललेलं हे देशातलं पहिलंच आंदोलन असावं . या आंदोलनाचा आखों देखा हाल समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेल्या कार्यकर्त्यांचा अनुभव . या आंदोलनाचं वेगळेपण सांगणारा . शेतकर् ‍ यांच्या चिकाटीला सलाम करणारा . चौकाचौकात उभे राहिलेले पोलीस दिसू लागले आणि सिंघू बॉर्डर जवळ आल्याची खूण पटली . गेले आठ महिने पंजाब - हरयाणामधील शेतकरी सिंघू बॉर्डरवर धरणं धरून बसले आहेत . त्या शेतकर् ‍ यांना आणि जमल्यास त्यांच्या नेत्यांना भेटण्याच्या उद्देशाने ११ जुलै २०२१ रोजी काही कार्यकर्त्यांसह आम्ही दिल्लीहून निघालो . शेतकरी आंदोलन जवळून पाहण्यास मिळेल या विचारांत २८ किलोमीटर अंतर कारने कधी कापलं ते समजलंच नाही . आंदोलन स्थानाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी लावलेल्या अडथळ्यांमुळे बंद . काही तर उखडून टाकलेले . बराच वेळ रस्ता शोधायचा प्रयत्न करूनही आंदोलन स्थान सापडत नव्हतं . शेवटी एका नाक

रन आऊट : प्रदीप चंपानेरकर

इमेज
अनुभव दिवाळी २०२१          मो बाईलवर बराच वेळ रिंग होत होती . घाईघाईत घेतला . फोन प्रकाशचाच होता . “ हॅलो आलोक , द न्यूज इज रिअली नॉट गुड . जयंत इज सर्टनली सिंकिंग . मी काही औषधं दिली आहेत . त्यांनी काही जादू केली , तर ठीक , अदरवाइज इट्स अ लॉस्ट केस .” “ आता काय करणार , प्रकाश ? जे होईल ते होईल .” बरीच रात्र झाली होती . बेचैनीतच झोपलो .   कुठे तरी अनोळखी प्रदेशात मी .. धूसर वातावरण . कुणीतरी मला हाका मारत होतं . आवाज तर संदीपचा होता . मागे वळून पाहिलं , तर संदीपच होता . पन्नास वर्षांपूर्वी हे जग सोडून गेलेला माझा भाऊ मला म्हणत होता , ‘ जयंत शेवटच्या घटका मोजतोय . त्याला भेट , पण काही विचारू नकोस . जे घडलं , ते घडलं . आता शेवटच्या क्षणी त्याच्या जीवाची तगमग नको होऊ देऊस ..’ माझ्या मनात आलं , होता तसाच आहे की हा . दुसर् ‍ याची काळजी करणारा . मी त्याला म्हटलं , ‘ त्याला नाही विचारणार . पण मग तू तरी सांग काय झालं होतं त्यादिवशी . रन आऊटच्या वेळी घडलं होतं तसंच झालं होतं ना त्यादिवशीही ?’   ... खडबडून जागा झालो . काहीच सुचत नव्हतं . परत झोपायचा प्रयत्न केला , पण झोप उडाली होती . क